‘आधुनिक साहित्याचा सामान्यांवर प्रभाव’

‘आधुनिक साहित्याचा सामान्यांवर प्रभाव’

Published on

भीमाशंकर, ता. २१ : ‘‘१९६० नंतरच्या आधुनिक साहित्य प्रवाहांनी सामान्यातला सामान्य माणूस साहित्याच्या केंद्रस्थानी आणला. त्याला आत्मभान दिले. हीच साहित्याची ताकद आहे,’’ असे उद्गार प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांनी काढले. ते पोखरी (ता. आंबेगाव) येथील श्री पंढरीनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पंढरीनाथ विद्या विकास मंडळ पोखरी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कोळपे होते. या चर्चासत्रामध्ये विविध महाविद्यालयातून ५० प्राध्यापक सहभागी झाले होते. यावेळी प्राचार्य डॉ. महादेव कांबळे (एसएनडीटी, मुंबई) डॉ. कल्याणी शेजवळ (मुंबई), डॉ. कृष्णा भवारी (सांगली), डॉ. सीताराम म्हस्के (कल्याण), डॉ. संदीप चपटे (शिवळे), डॉ. संजय चिताळकर (शिवळे), प्रा. स्वप्नील जोशी, प्रा. शीतल चव्हाण, प्रा. पायल जगताप, डॉ. सुनीलदत्त गोडसे, डॉ. दिलीप कसबे, डॉ. वसंत गावडे, प्राचार्य डॉ. प्रल्हाद शिंदे, डॉ. सुनील घनकुटे, प्रा विश्वनाथ भंडारी, प्रा. मंगला खिस्से, प्रा. प्रतिभा दरे, डॉ. नामदेव बांगर, डॉ. शामराव सावंत, डॉ. प्रदीप बच्छाव, प्रा. मनोहर मोहरे, प्रा. सुवर्णा धादवड यांनीही आपले शोध निबंध सादर केले.
याप्रसंगी डॉ. गोविंद गारे यांच्यावरील ‘दीपस्तंभ’ नावाचा डॉ. संदीप चपटे यांचा संपादित ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. प्राचार्य डॉ. शशिकांत साळवे यांनी प्रास्ताविक, तर संयोजक प्रा. उज्ज्वला गंगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कैलास कोकणे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com