शिक्षकांची बदली प्रक्रिया संपता संपेना

शिक्षकांची बदली प्रक्रिया संपता संपेना

Published on

पुणे, ता. ३० : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदलीचे सातही टप्पे पूर्ण झाले. मात्र, शिक्षकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याने कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला मागे घ्यावे लागले. आता न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी २५५ शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. त्यामुळे इतर चार हजार शिक्षकांना या अडीचशे शिक्षकांसाठी थांबावे लागणार आहे. परिणामी जिल्हा परिषद शिक्षकांची सात महिन्यांपासून सुरू असलेली बदली प्रक्रिया पूर्ण होण्याचे काही केल्या नाव घेईना.

जिल्हा परिषद प्रशासनाकडून यावर्षी शिक्षण आणि आरोग्य या दोन सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे विषयाला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. शिक्षणामध्ये मॉडेल स्कूल उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. परकीय भाषेसाठी निवडक शिक्षकांसाठी प्रशिक्षण सुरू केले आहे. नासा, इस्रोला विद्यार्थी पाठविण्यासाठी निवड प्रक्रिया राबवली. एका बाजूला प्रशासन हे सर्व करत असताना, शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ही मार्च महिन्यापासून सुरू आहे. यामध्ये चार हजार ४४२ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. परंतु अगोदर बदली प्रक्रियेतील शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीचा मुद्दा पुढे आला. अजूनही तो पूर्णपणे निकाली निघालेला नाही. त्यानंतर शिक्षकांनी जिल्हा परिषदेत दाद मागण्या ऐवजी थेट न्यायालयात दाद मागितली. परिणामी ज्या शिक्षकांची बदली झाली आहे, अशा शिक्षकांना दिलेले कार्यमुक्तीचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला थांबवावे लागले.


सात टप्प्यांमध्ये बदली प्रक्रिया
मार्च महिन्यात बदलीपात्र शिक्षकांची ऑनलाइन माहिती भरण्यास सुरुवात केली. त्यानंतर विविध प्रक्रिया पार पाडत सर्व संवर्गातील सात टप्प्यांमध्ये बदली प्रक्रिया प्रशासनाकडून सप्टेंबरमध्ये पूर्णत्वास गेली. त्यामुळे जवळपास सात महिन्यांपासून सुरू असलेली बदली प्रक्रिया पूर्ण होण्यास ऑक्टोबर उजाडत आहे.


काय परिणाम झाला...
- शैक्षणिक वर्ष सुरू तीन महिन्याचा कालावधी
- बदली झालेले शिक्षक अजून त्यांच्या पूर्वीच्याच शाळेवर कार्यरत
- अनेकांनी मोठ्या सुट्ट्या घेतल्या
- काही प्रमाणात का होईना अध्यापनाकडे दुर्लक्ष
- बदली प्रक्रियेमध्ये शिक्षकांचा वेळ खर्च वाया


बदली झालेले शिक्षक...............४,२४२
सीईओंकडे सुनावणी होणारे शिक्षक...............२५५
जिल्ह्यातील एकूण शाळा...............३ हजार ५४६
जिल्ह्यातील एकूण शिक्षक...............१० हजार ८३०


बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे. या मागणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांची भेट घेऊन विनंती केली. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर ही कार्यमुक्त करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
- बाळासाहेब मारणे, अध्यक्ष, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ


शिक्षकांची सात दिवसांच्या आत सुनावणी घेतली जाणार आहे. सर्व शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात येतील.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com