इथेनॉलच्या धोरणाविरोधात 
बोलणारी मी एकमेव : सुळे

इथेनॉलच्या धोरणाविरोधात बोलणारी मी एकमेव : सुळे

सोमेश्वरनगर : ‘‘मोदी सरकारने इथेनॉलचे धोरण बदलल्याने राज्याचे तीन हजार कोटींचे आणि शेतकऱ्यांचे प्रतिटन तीनशे रुपयांचे नुकसान झाले. या विरोधात देशात बोलणारी मी एकमेव खासदार आहे. पियुष गोयल म्हणायचे, ‘तुमचे कारखाने आहेत. फार पैसे मिळतात.’ त्यांना मी सांगितले, ‘माझा एकही साखर कारखाना नाही.’ भाजपचेही लोक मग साहेबांना भेटले आणि इथेनॉल धोरणात थोडा दिलासा मिळाला,’’ अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
नीरा (ता. पुरंदर) येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या सभेत त्या बोलत होत्या. यामध्ये त्यांनी आगामी काळात सोमेश्वर, माळेगाव हे साखर कारखाने आणि पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुका अजित पवार व महायुतीच्या विरोधात लढविणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी तासगावचे युवा नेते रोहित पाटील म्हणाले, ‘‘भाजपचे नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. उलट शेतकऱ्यांना गोळ्या घालतात. त्यांच्या मंत्र्यांचा मुलगा शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालतो. अशा काळात शेतकऱ्यांचे, सामान्यांचे प्रश्न घेऊन शाश्वत विकास करणाऱ्या पवारसाहेबांना साथ देण्याऐवजी काही लोक सूर्याजी पिसाळ होऊन पाय खेचण्याचं काम करतात.’’
आमदार संजय जगताप म्हणाले, ‘‘देशाच्या सत्तेवर धर्मांध शक्ती बसली आहे. तरुण, महिला, शेतकरी यांना पाठबळ घेत नाही. हे माणूसघाणं आणि शेतकरीविरोधी सरकार आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com