शिरूरमध्ये शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

शिरूरमध्ये शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

Published on

टाकळी हाजी, ता. ४ : शिरूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे पिके सुकू लागली आहेत. त्यांना पाण्याची अत्यंत गरज भासू लागल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

शेतकरी विहिरी किंवा नदीवरून पाणी देण्याऐवजी पावसावरच अवलंबून असतात. पावसाचे पाणी थेट मुळाशी पोहोचून पिकांना जास्त परिणामकारक ठरते. सध्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पिकांमध्ये खतांची मात्रा दिल्यास पावसामुळे खते लगेच लागून उत्पादनात वाढ होते, मात्र पावसाच्या अनुपस्थितीमुळे त्याचा फायदा मिळत नाही. दरम्यान, सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीप पेरण्या उरकल्या होत्या. बाजरी, मुग, सोयाबीन, तूरभुईमुग अशी पिके यंदा मोठ्या क्षेत्रावर पेरण्यात आली आहेत.

पश्चिम भागातील आमदाबाद, ढोकसांगवी, सोनेसांगवी, वाघाळे, मलठण या परिसरातील जिरायती जमिनींमध्ये पेरण्या झाल्या आहेत. मात्र, पाण्याच्या सुविधेअभावी या भागातील शेतकरी अधिक त्रस्त झाले आहेत. बेट भागातील काही गावांमध्येही अशीच परिस्थिती असून, जिरायती क्षेत्रांना पावसाची तातडीची गरज भासू लागली आहे.

खरिपाची पिके जोरात असून, सध्या पावसाची अंत्यत गरज आहे. काही ठिकाणी पिके सुरू लागली आहेत. वेळेत पाऊस झाल्यास उत्पादनात मोठी वाढ होईल.
- सचिन माशेरे, शेतकरी, आमदाबाद (ता. शिरूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com