बाजारभावातील घटीमुळे कांदा उत्पादक हवालदिल

बाजारभावातील घटीमुळे कांदा उत्पादक हवालदिल

Published on

टाकळी हाजी, ता.५ : टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरातील बेट भाग हा कांद्याचे प्रमुख आगार ठरला आहे. मार्च-एप्रिल महिन्यांत कांदा काढणी करून शेतकऱ्यांनी चाळीत साठा ठेवला. मात्र, सध्या कांद्यास प्रतिकिलोस १० ते १२ रुपये बाजारभाव मिळत आहे. बाजारभावात घट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेतकऱ्यांना कांदा उत्पादनासाठी किलोमागे १५ रुपये किलोपर्यंत उत्पादन खर्च येत आहे. रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी, मशागतीचा वाढलेला खर्च यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.शेतकऱ्यांनी कांद्याच्या पैशातून मुलांचे शिक्षण, लग्न, आरोग्य खर्च, तसेच बँकेचे कर्ज फेडण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, बाजारभावाने त्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे. वर्षभर प्रचंड मेहनत घेऊन कांदा पिकवावा आणि नंतर शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे नुकसान सहन करावे, ही शोकांतिका शेतकऱ्यांच्या वाट्याला येत आहे. सध्या पावसाळी हवामानामुळे कांदा चाळीत खराब होऊ लागला असून शेतकरी मिळेल त्या भावात कांदा विकायला सुरुवात करू लागले आहेत .

आम्हाला अनुदान नको, सवलती नकोत. आम्ही काबाडकष्ट करून विकविलेल्या मालाला हमीभाव द्या, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. शासनाने तातडीने लक्ष घालून कांद्यास योग्य हमीभाव द्यावा, अन्यथा शेतकरी आंदोलनाचा इशारा देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com