बिबट हल्ल्यात आजून किती जीव गेल्यावर जाग येणार?
टाकळी हाजी, ता. १६ : “किती संसार उद्ध्वस्त होण्याची वाट पाहणार? अजून किती निष्पापांचे जीव बिबट्यांच्या हल्ल्यात गेले की वनविभागाला जाग येणार आहे? माणसांपेक्षा बिबट्यांची काळजी मायबाप सरकारला जास्त आहे का?” असा संतप्त सवाल गुरुवारी (ता.१६) ग्रामस्थांनी थेट प्रशासनाला करीत शिरूर-जुन्नर-आंबेगाव पारनेर तालुक्यातील नागरिकांनी पंचतळे (ता. शिरूर) येथे रास्ता रोको आंदोलन केले.
पिंपरखेड येथे रविवारी (ता. १२) शिवन्या शैलेंद्र बोंबे (साडेपाच वर्षे) या बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे जांबूत–पिंपरखेड पंचतळे येथे बेल्हे–जेजुरी महामार्गावर बिबट्यांच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी शिरूर, आंबेगाव, जुन्नर आणि पारनेर तालुक्यातील नागरिकांनी
आंदोलनात म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्यासह अरुण गिरे, शिवाजीराव नांदखिले,डॉ. सुभाष पोकळे, सुरेश भोर, रवींद्र करंजखेले, प्रियांका शेळके, अरुणा घोडे, वासुदेव जोरी, दामूशेठ घोडे, बाळशिराम ढोमे, माऊली ढोमे, दत्ता म्हस्के यांसारखे अनेक नेते सहभागी झाले होते. वनविभागाकडून उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस, शिरूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे हे अधिकारीही उपस्थित होते.
दरम्यान, मयत शिवन्याची लहान बहीण शरयू बोंबे व आई दिव्या बोबें यांच्या हस्ते निवेदन तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आले. दरम्यान, आमदार सदाभाऊ खोत यांनीही आंदोलनाला भेट दिली.
बिबट्यांची वाढती संख्या नागरिक व वन विभागापुढे मोठे आवाहन आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित पुण्यात बैठक झाली.या मधे नव्याने दोनशे पिंजरे देण्यात येणार आहेत. बिबट्यांच्या नसबंदीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. लवकर परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, तसेच या परिसरात बिबट ठेवण्यासाठी केंद्र उभारण्यात येईल. तसेच
- प्रशांत खाडे, उपवनसंरक्षण अधिकारी.
भर पावसातही आंदोलन सुरूच!
रस्त्यावर आंदोलन सुरू असताना अचानक मुसळधार पाऊस आला, मात्र संतप्त नागरिकांनी मागणीवर ठाम राहून आंदोलन सुरूच ठेवले. पावसातही घोषणाबाजी सुरू ठेवत आंदोलनकर्त्यांनी वनखाते व बिबटयांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
वन अधिकाऱ्यावर प्रश्नांचा भडिमार
या वेळी उपस्थित ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांच्यासह सामान्य नागरिकांनी असंख्य प्रश्नाची सरबत्ती केली, तसेच ठोस आश्वासन मिळत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलन थांबविण्यास नकार दिला .
00706
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.