उरुळी कांचनच्या सरपंचपदी 
आज कोण होणार विराजमान?

उरुळी कांचनच्या सरपंचपदी आज कोण होणार विराजमान?

Published on

उरुळी कांचन, ता. १८ : उरुळी कांचनच्या (ता. हवेली) सरपंच ऋतुजा कांचन यांनी राजीनामा दिल्याने या पदावर शुक्रवारी (ता. १९) होणाऱ्या निवडणुकीत कोण व किती दिवसांसाठी आरूढ होणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
ऋतुजा कांचन यांनी दिलेला राजीनामा २८ नोव्हेंबरच्या ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाच्या मासिक बैठकीमध्ये खात्री करून घेऊन मंजूर करण्यात आलेला आहे. १९ डिसेंबर ही सरपंच निवडीची अधिकृत तारीख ठरलेली आहे. ग्रामपंचायतीची मुदत संपायला अवघे २ महिने बाकी असताना व सरपंचपदाची निवडणूक होत आहे. सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी आहे. १७ सदस्यांच्या कार्यकारी मंडळात सरपंचपदासाठी सध्या तरी दोन जण प्रबळ इच्छुक आहेत. यामध्ये एक सर्वसाधारण महिला व एक ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेला पुरुष दावेदार मानले जातात.
सन २०२०मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १७ जागांवर १२- ३- २ अशा गटबाजीतून सदस्य निवडून आले. सामोपचाराने १२ जणांच्या गटाने सरपंच व उपसरपंचपदी समन्वयातून प्रत्येकाला संधी देण्याच्या भूमिकेतून सत्ता काबीज करण्याला प्राधान्य दिले. मात्र, त्यानंतर हे १७ही जण आपल्या वॉर्डातील विकास कामांच्या संदर्भात एकत्र येऊन त्यांच्यामधील विरोधाची दरी कमी झाली आणि त्यातून तीन सदस्य निवडून आणत ग्रामपंचायतीमध्ये पाऊल ठेवलेले अमितबाबा कांचन हे सरपंच होण्याची किमया घडली! आता ऋतुजा कांचन यांच्यानंतर या पदावर कोण आणि तो किती दिवसासाठी आरुढ होतोय, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com