आष्टापुरात बिबट्याकडून तीन बकऱ्यांचा फडशा
उरुळी कांचन, ता. ८ : आष्टापूर (ता. हवेली) येथील बिरोबाचा माळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात बुधवारी (ता. ८) रात्री तीन बकऱ्या ठार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सचिन गुलदगड या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.
बिबट्याने दोन दिवसापूर्वी येथील दादा शेंडगे या शेतकऱ्याच्या बकऱ्यांच्या वाड्यावर हल्ला करून एक बकरी ठार केली होती. त्यामुळे या परिसरात जास्तीत जास्त पिंजरे लावून बिबटे जेरबंद करावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मागील महिन्यामध्ये बिबट्याने येथील एका शेतकरी महिलेवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. त्यानंतर बिबट्याचे पशुधनावरील हल्ले थांबलेले नाहीत. मागील आठवड्यात येथे एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते.
बिबट्याने तीन बकऱ्या मारल्याची घटना आष्टापुरात बुधवारी रात्री घडली आहे. त्याचा पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे.
- कोमल सकपाळ, वनरक्षक, आष्टापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

