शिरसाई योजनेतून रब्बी आवर्तनाची मागणी

शिरसाई योजनेतून रब्बी आवर्तनाची मागणी

Published on

उंडवडी, ता. १२ : बारामती तालुक्यातील जिरायती पट्ट्याला वरदान ठरलेली शिरसाई उपसा सिंचन योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यंदा मे महिन्यातील दमदार पावसानंतर खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत होते. तसेच, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात हमखास पडणारा पाऊस अल्प प्रमाणात झाल्याने रब्बी हंगामातील पेरण्याही धोक्यात आल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर, शिरसाई योजनेतून रब्बी आवर्तन सोडण्याची मागणी लाभक्षेत्रातून जोर धरू लागली आहे. या भागात कडवळ, मका, ऊस यांसारखी चारा पिके तसेच ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र येथील शेतकरी पाण्याअभावी त्रस्त आहेत. त्यामुळेच उपसा सिंचन सुरू करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
शिरसाई योजनेच्या लाभार्थी क्षेत्रात अंजनगाव, जळगाव सुपे, सोनवडी सुपे, उंडवडी सुपे, कारखेल, खराडेवाडी, साबळेवाडी, गाडीखेल, शिर्सुफळ, बऱ्हाणपूर, गोजुबावी, उंडवडी कडेपठार, जराडवाडी आदी गावांचा समावेश होतो. या सर्व भागात रब्बी हंगामात पेरण्या सुरळीत पार पाडण्यासाठी तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com