नीरा डाव्या कालव्यातून खरिपासाठी पहिले आवर्तन

नीरा डाव्या कालव्यातून खरिपासाठी पहिले आवर्तन

वालचंदनगर, ता. ३१ : नीरा डाव्या कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पहिल्या आवर्तनास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्य ५९ क्रमांकाच्या वितरिकेवरील पाणी देण्याचे काम सुरू आहे.
इंदापूर तालुक्याला पावसाने ओढ दिली आहे. जून महिन्यामध्ये जोराचा एकही पाऊस झाला नाही. मात्र, सध्या दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने उघडीप दिली असून, ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. दमदार पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. काही शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर तसेच रिमझिम पावसावर खरिपातील पिकांच्या पेरण्या केल्या होत्या. मात्र, पिकांना पाण्याची गरज जाणवू लागली होती. विहिरीचे पाणी देऊन शेतकरी पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. नीरा खोऱ्यातील धरणामध्ये सुमारे ७० टक्के पाणी झाल्यामुळे नीरा डाव्या कालव्यातून खरीपाच्या हंगामातील पहिल्या आवर्तनास सुरुवात झाली. टेल टू हेड पद्धतीने शेतकऱ्यांना पाणी देण्यास सुरवात केली, असून सध्या शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या पिकांना कालव्याचे पाणी मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, उन्हाळ्यामध्ये सणसरजवळ तीन वेळा नीरा डावा कालवा फुटला होता. यामुळे पिके वाहून गेली होती तर पाणी न मिळाल्याने पिके जळून गेली होती. सध्या कालव्याला पाणी आले असून लवकर पाणी मिळावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

शेटफळ तलावामध्ये ६ टक्के पाणी...
इंदापूर तालुक्यातील शेटफळच्या तलावामध्ये सध्या सहा टक्के पाणी साठा आहे. खरीपाच्या हंगामातील पहिले आवर्तन संपल्यानंतर किंवा तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्यास शेटफळच्या तलावामध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले..


03384

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com