इंदापूरच्या पाण्याबाबत पंतप्रधानांशी चर्चा

इंदापूरच्या पाण्याबाबत पंतप्रधानांशी चर्चा

वालचंदनगर, ता. २ : ‘‘मुळशीच्या धरणातील २५ टीएमसी पाणी पुण्याला देऊन खडकवासला धरणातील पाणी आपल्या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी देण्याचे नियोजन आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावणे गरजेचे आहे. इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या शेतीच्या पाण्याचाही प्रश्‍न महत्त्वाचा आहे. मोठ्या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मोठ्या निधीची गरज असून, केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयाशिवाय हे शक्य होणार नाही. यासंदर्भात पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चर्चा झाली असून, त्यांनी मदतीचे आश्‍वासन दिले आहे. मात्र, पुणे शहर, जिल्ह्यातील सर्व खासदार त्यांच्या विचाराचे असणे गरजेचे आहे,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सणसर (ता. इंदापूर) येथील सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रेय भरणे, मोहोळचे आमदार यशवंत माने, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, कारखान्याचे संचालक अॅड. रणजीत निंबाळकर, माजी संचालक भाऊसाहेब सपकळ, सरपंच पार्थ निंबाळकर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ‘‘लाकडी निंबोडी सिंचन योजना गेल्या अनेक वर्षापासून रखडली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे योजना मार्गी लागली. कॉंग्रेसच्या काळात हे झाले नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातून नितीन गडकरी राष्ट्रीय महामार्गाची कामे वेगाने करत आहेत. कॉंग्रेसने ७० वर्षांत रस्ते केले नाहीत. त्यावेळी ते झोपले होते का?’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com