जयगणेश जलाशयामध्ये तीस टक्केच पाणीसाठा

जयगणेश जलाशयामध्ये तीस टक्केच पाणीसाठा

Published on

वाल्हे, ता.११ : पिंगोरी (ता.पुरंदर) परिसराला सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या जयगणेश जलाशयात आजअखेर तीस टक्केच पाणीसाठा आहे. गतवर्षीपेक्षा वीस टक्के कमी पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत जलाशयाच्या पाणीसाठ्यात घट झाल्याचे सरपंच संदीप यादव यांनी सांगितले.
पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि पिंगोरी ग्रामस्थांच्या श्रमदानातून पुनर्जीवित करण्यात आलेला जय गणेश जलाशय गेल्या दोन वर्षांपासून अल्प पर्जन्यमान असताना देखील पिंगोरीकरांची तसेच आडाचीवाडी, वाल्ह्याच्या काही वाड्या वस्त्यांची तहान भागवत होता. पिंगोरीसह आडाचीवाडी व वाल्हेच्या वाड्या-वस्त्यांसाठी हा जलाशय जीवनदायी ठरला आहे.गतवर्षी या जलाशयात पन्नास टक्के पाणीसाठा होता सध्या तीस टक्के म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत वीस टक्के कमी आहे.
यंदा जुलै महिना उजाडला तरी पावसाने ओढ दिली आहे. यामुळे जलाशयातील पाणीसाठा कमी झाला आहे. शेतकऱ्यांसह नागरिक हवालदिल झाले आहेत. पावसाअभावी परिसरातील पिण्याच्या पाण्यासह बागायतीसह जिरायती शेतीचे नुकसान होणार असल्याची राहुल शिंदे यांनी व्यक्त केली.


01770

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.