कर्नलवाडीतील बंद शिवार रस्ते होणार खुले

कर्नलवाडीतील बंद शिवार रस्ते होणार खुले

Published on

वाल्हे, ता. १८ : ‘मुख्यमंत्री बळिराजा पाणंद रस्ते’ या योजनेअंतर्गत कर्नलवाडी (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीने पुढाकार घेत ग्रामसभेत विशेष ठराव संमत केला असून, गावातील पाणंद रस्त्यांना मोकळा श्वास मिळणार आहे. शेतशिवारात गेले अनेक वर्षे बंद असलेले रस्ते, गाडीवाट, पायवाट, वहिवाटीचे मार्ग या योजनेच्या माध्यमातून आता पुन्हा पूर्ववत होणार आहेत. शेत मालाची ने-आण करणे सुलभ होणार आहे. यामुळे ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कर्नलवाडी येथे बुधवारी (ता.१७) सरपंच सुवर्ण महानवर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेमध्ये गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये ‘मुख्यमंत्री बळिराजा पाणंद रस्ते’ योजनेतून गावातील बंद पडलेले रस्ते खुले करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेले आणि अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांना अडचणीत टाकणारे शिवार रस्ते या योजनेमुळे खुले होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीपर्यंत पोहोचण्याची गैरसोय दूर होणार असून, शेती कामकाज अधिक सुलभ होणार आहे.

ठरावानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी गावातील विविध शिवार रस्त्यांची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरंदरचे उपाध्यक्ष पृथ्वीराज निगडे, सदस्य नंदकुमार निगडे, पोलिस पाटील मनोज खोमणे, किसन महानवर, किरण गदादे, विराज निगडे, अशोक रासकर, प्रसाद कर्णवर, प्रदीप रासकर, शरद लोंढे, राजेंद्र रासकर, श्रीकांत रासकर, सुनील रासकर, नीलेश गदादे शशिकांत निगडे, किरण गदादे, रोहन रासकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

‘सहकार्य न केल्यास शासनाचे सहकार्य घेणार’
सरपंचांनी सुवर्णा महानवर यांनी सांगितले की, योजनेला ग्रामस्तरावर चांगला प्रतिसाद मिळत असून, ठरावानंतर जर काहींनी सहकार्य न केले, तर पोलिस प्रशासन व भूमिअभिलेख खात्याच्या सहकार्याने रस्ते खुले केले जातील. शेतकऱ्यांचा हा मूलभूत हक्क असून, सरकारने दिलेला न्याय पोहचवण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे.

‘मुख्यमंत्री बळिराजा पाणंद रस्ते’ योजना केवळ पायवाटांपुरती मर्यादित नसून, ती ग्रामीण जीवनात मोलाचे योगदान देणाऱ्या कृषी अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे. अनेक शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या शेतात जाणाऱ्या वाटेवर अतिक्रमण झाल्यामुळे अडचणीत होते. या योजनेमुळे त्यांच्या समस्या सुटणार आहेत आणि शेतीच्या कामांमध्ये होणारी खोळंबा थांबणार आहे.
- स्वप्नाली निगडे, उपसरपंच कर्नलवाडी (ता. पुरंदर)

05246

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com