वाल्ह्यात वाचले दोन शेळ्यांचे प्राण
वाल्हे, ता. ३० : वाल्हे (ता. पुरंदर) येथील रेल्वे स्थानकाशेजारील भुयारी मार्गालगत असलेल्या वीज रोहित्राच्या पेटीतून विद्युत प्रवाह सुरू असताना दोन शेळ्या चिकटल्या होत्या. मात्र, मेंढपाळ छाया मदने यांच्या प्रसंगावधानामुळे त्या शेळ्यांचे प्राण वाचविले आणि दुर्घटना टळली.
ही घटना मंगळवारी (ता. ३०) सकाळच्या सुमारास घडली. मदने आपल्या शेळ्यांना चारत नेत असताना त्या भुयारी मार्गावरून जात होत्या.
त्याचवेळी त्यांच्या लक्षात आले की दोन शेळ्या रोहित्र पेटीच्या जवळ चिकटून उभ्या आहेत आणि हालचाल करत नाहीत. संशय आल्यामुळे त्यांनी
तत्काळ परिस्थितीची पाहणी केली असता त्या शेळ्या वीज प्रवाहामुळे पेटीला चिकटल्याचे त्यांच्या लक्षात आले. मदने यांनी प्रसंगावधान राखून उपलब्ध
काठीच्या सहाय्याने त्या शेळ्यांना सावधपणे रोहित्रापासून दूर केले आणि त्यांचा जीव वाचवला. त्यानंतर तेथून जाणारे नीलेश पवार यांनी याबाबत
सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब मदने यांनी कळविल्यानंतर मदने यांनी महावितरणचे कर्मचारी रवींद्र सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला. कर्मचारी घटनास्थळी
दाखल झाल्यानंतर रोहित्राचा वीज प्रवाह बंद करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.