वाल्ह्यात पिकांच्या पंचनामे सुरू
वाल्हे, ता. ३ : वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे कांद्यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकसान झालेल्या भागाचे महसूल व कृषी विभागाच्या वतीने तातडीने स्थळ पाहणी करून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मुसळधार पावसामुळे वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी आदी भागांतील शेतजमिनींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या पाण्यामुळे कांदा पिके काही दिवसांपासून पाण्यात राहिल्याने ती कुजून गेली आहेत. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे हजारो रुपये खर्च वाया गेले. कांद्याबरोबरच काही ठिकाणी भुईमूग व भाजीपाला पिकांनाही हानी पोचली असल्याचे प्राथमिक निरीक्षणांवरून समोर आली असल्याचे गाव कामगार तलाठी सतीश उमाप, तलाठी सागर पाटील, कृषी सहाय्यक संतोष जायपत्रे, मयुरी नेवसे, ग्रामपंचायत
कर्मचारी दिगंबर पवार यांनी सांगितले.
परिस्थितीची दखल घेत महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि कृषी सहाय्यक यांनी नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. संबंधित अधिकारी शेतांत जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. तहसील कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी सातबारा, पीक पेरणी माहितीपत्रसह आवश्यक कागदपत्रे तत्काळ सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळू शकेल, असे आवाहन महसूल व कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
कांदा उत्पादक शेतकरी संकटात
पावसामुळे झालेल्या या नुकसानीने वाल्हे परिसरातील शेकडो एकर क्षेत्रातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने
तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी आडाचीवाडी उपसरपंच मोहन पवार यांसह शेतकऱ्यांमधून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

