उसाचे पाचट म्हणजे सोनं

उसाचे पाचट म्हणजे सोनं

Published on

आळेफाटा, ता.२७ : ‘‘उसाचे पाचट म्हणजे सोनं असून, ते जाळू नका,’’ असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या ऊस नियोजन समितीचे सदस्य विकास चव्हाण यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
जुन्नर तालुक्यात ऊस तुटल्यानंतर बहुतेक शेतकरी राहिलेले पाचट पेटवून देतात. ते पेटवून न देता त्यावर प्रक्रिया करून खत तयार करावे, असे आवाहन चव्हाण यांनी आळेफाटा (ता. जुन्नर) येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना केला. ते गावोगावी जाऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन
करीत आहेत. दरम्यान, चव्हाण यांनी स्वतःच्या शेतात आडसाली उसात विक्रमी एकरी १२६ टन तर खोडव्याचे तब्बल ११० टनाचे उत्पन्न त्यांनी घेतले आहे. केवळ स्वतःचे उत्पन्न वाढवून ते थांबले नाही तर महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांपर्यंत त्यांनी हे तंत्रज्ञान पोहचवण्याचे काम करत आहे.
पाचट शेतात ठेवल्यामुळे होणारे फायदे सांगितले यामध्ये
- शेतात पाचट ठेवल्यामुळे वाफसा राहतो व पांढऱ्या मुळांची वाढ होते.
- पाण्याची बचत; पाचट आच्छादनामुळे संपूर्ण जमीन झाकली जाते
- पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. दहा ते वीस दिवस ओलावा टिकतो
- पाण्याची ४० टक्के पर्यंत बचत होते.
- पर्यावरणाच्या संरक्षणासह प्रदूषण थांबते
- उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.


पाचट जाळण्याचे दुष्परिणाम
- जमिनीतील उपयुक्त जीव जिवाणूंची संख्या घटते.
- जमिनीचा थर कडक होतो, यामुळे उत्पादन घटते
- ग्लोबल वॉर्मिंगचे संकट वाढत आहे.
- एकरी दीड ते दोन टन सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात
07496

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com