जावळीकर चार महिन्यांपासून धुळीच्या विळख्यात
धुळीच्या त्रासाने जावळीकर हैराण
चार महिन्यांपासून समस्या; जडताहेत फुफ्फुसचे आजार, व्यावसायिकांचे नुकसान
विलास साळुंखे : सकाळ वृत्तसेवा
भुईंज, ता. १५ : पाचवड ते नवीन महाबळेश्वर मार्गावरील पाचवड- अमृतवाडी- मेढा या पट्ट्यात गेल्या चार महिन्यांपासून रस्त्याची सुरू असलेली मोडतोड नागरिकांसाठी त्रासाची ठरली आहे. वारंवार सूचना करूनही खड्ड्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, रस्त्याची सुधारणा होत नाही. संपूर्ण रस्ताच उखडून त्यावर धुरळा होणारा मोकळा मुरूम टाकण्याचा अव्यवहार्य प्रयोग करण्यात आला आहे.
खडीमुळे दुचाकीस्वारांसाठी जीवघेणा धोका निर्माण झाला असून, वाहन चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. रस्त्यावरून उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे परिसरातील वातावरण गढूळ होत आहे. दुकानदार, हॉटेल व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचे हाल अधिकच वाढले आहेत. धुळीमुळे माल खराब होणे, ग्राहकांची संख्या घटणे आणि दैनंदिन आर्थिक नुकसान या समस्यांनी व्यापारी त्रस्त आहेत. नागरिकांच्या आरोग्यावरही याचा गंभीर परिणाम दिसत आहे.
दरम्यान, या महामार्गावर अवजड वाहतूकही सुरू असल्याने परिस्थिती अधिक धोकादायक झाली आहे. उडणाऱ्या धुळीमुळे पाचवड- मेढा मार्गावरील रस्त्यावरील गावातून अक्षरशः धुक्यासारख्या वातावरणाने वेढले जाते. नागरिकांचा संयम सुटत असून, ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा विरोधात तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, अमृतवाडीनजीक राज्यमार्गाचीही अवस्था बिकट असून, पाचवड अमृतवाडीपट्टा मोठ्या खड्ड्यांनी छिन्नविछिन्न झाला आहे. अपघातांची मालिका सुरू असून, वाहनचालकांकडून त्वरित खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.
----------------------------
आरोग्य धोक्यात
धुळीच्या वाढत्या प्रमाणामुळे फुफ्फुस श्वसनाचे आजार, अॅलर्जी, खोकला आणि दमा असणाऱ्या रुग्णांची स्थिती बिघडत आहे. अनेकांना पाठदुखी, मणक्याचे त्रास आणि डोळ्यांच्या समस्या उद्भवत आहेत, तरीही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. काम चालू असल्याचे सांगितले जात असले, तरी रस्ता कधी तयार होणार याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाकडे नाही.
-----------------------------
कोट
पाचवड- नवीन महाबळेश्वर राज्यमार्गाचे काम कुडाळ- पाचवड मार्गावर ठिकठिकाणी सुरू असले, तरी पाचवड- अमृतवाडी- सरताळे येथील संपूर्ण पट्ट्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे. अपघातांचीही मालिका सुरू असून, प्रशासन मात्र शांत बसले आहे. यावर नागरिकांसह वाहनधारकांनी संताप व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याची व्यवस्था करून ठेकेदार कंपनीला धुळीबाबत उपाययोजना राबविण्याच्या सूचना कराव्या.
- दत्तात्रय बांदल, संचालक, बाजार समिती, वाई.
----------------------------------
फोटो आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

