राज्यातील नद्या जलपर्णीमुक्त करा

राज्यातील नद्या जलपर्णीमुक्त करा

Published on

पुणे, ता. २६ : राज्यातील नद्या जलपर्णीमुक्त करण्यासाठी रसायनांचा योग्य प्रमाणात वापर करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत केली. ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील नदीमधील जलपर्णी रसायनांचा वापर करून काढण्याचा प्रयोग चंद्रशेखर भडसावळे यांनी यशस्वी केला. सध्या ही नदी स्वच्छ व जलपर्णीमुक्त असून हाच पर्याय राज्यातील जलपर्णी असलेल्या नद्यांवर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत. परंतु, रसायनांच्या वापरास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ परवानगी देत नाही. तरी नागरिकांच्या आरोग्यास बाधा होणार नाही, एवढ्या प्रमाणात रसायनांच्या वापरास राज्य सरकारने परवानगी दिल्यास अनेक नद्या जलपर्णीमुक्त होतील. याबाबत सूचना करण्याची मागणी शिरोळे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. याबाबत उदय सामंत यांनी पुण्यामध्ये बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.