‘खडकवासला’चे आवर्तन इंदापूर तालुक्यात दाखल
कळस, ता. १५ : खडकवासला कालव्याचे पहिले रब्बी आवर्तन इंदापूर तालुक्यात दाखल झाले आहे. कालव्याचे पाणी ‘टेल’ला पोचल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाण्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. तालुक्यातील पाझर तलाव व बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडून ते भरण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागाचे इंदापूर उपविभागीय अभियंता पंकज हुलसुरे म्हणाले, ‘‘सध्या रब्बीतील पहिले आवर्तन सुरु झाले आहे. या आवर्तनाचा कालावधी ६० दिवसांचा असेल. यापैकी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणी वितरण केले जाईल. यानंतर पाण्याची बचत झाल्यास दुसऱ्या आवर्तनाचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.’’
बळीराजा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विजय गावडे म्हणाले, ‘‘सध्याच्या आवर्तनातून तालुक्यातील अनेक तलाव व बंधारे भरणे शक्य आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने कालव्याच्या जीवावरील सर्व तलाव व बंधारे तुडूंब भरावेत. याशिवाय तालुक्याला रब्बी हंगामात दोन व उन्हाळी हंगामात दोन आवर्तने देण्याची गरज आहे. दोन-चार दिवस तालुक्यात केवळ पाण्याचा झुळवा दाखविण्याचा नेहमीचा फॉर्म्युला राबविण्याची पद्धत बंद करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

