नदीत सोडले जाते सांडपाणी
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. ९ : पुणे महापालिका २२ टीएमसी पाणी वापर करीत असून, त्यातील ८० टक्के म्हणजे १७.६० टीएमसी सांडपाणी तयार होते. यापैकी फक्त ६.२० टीएमसी पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. जवळपास ११.४० टीएमसी पाण्यावर प्रक्रिया न करताच ते नदीमध्ये सोडण्यात येते. यामुळे प्रचंड प्रदूषण होत असल्याची माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज दिली.
जलसंपदा विभागाच्या पुणे पाटबंधारे विभागाकडून पुणे महापालिकेसाठी २०२५-२६ या वर्षासाठी १६.३२ टीएमसी पाणी आरक्षित करण्याची मागणी लक्षवेधीच्या माध्यमातून योगेश टिळेकर यांनी विधान परिषदेत केली. यामध्ये पाणी गळती कमी केल्याचे नमूद केले आहे. त्यावर विखे म्हणाले, महापालिकेस मंजूर १६.६१ टीएमसी पाणी हे पुणे शहराच्या २०३१ च्या ७६.१६ लाख लोकसंख्येसाठी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या मापदंडापासून मंजूर आहे. अधिकचा पाणीवापर सुरू राहिल्यास ग्रामीण भागास पिण्यासाठी तसेच खडकवासला प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यातील सिंचनासाठी दरवर्षी पाणी कमी उपलब्ध होते. त्यामुळे तेथील शेतकरी व लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी आहे. सध्या पुणे महापालिकेकडे जादा पाणीवापर व प्रदूषणाचा दंड असे ८६८.५१ कोटी प्रलंबित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

