वृक्षारोपण करताना मातीचा अभ्यास महत्त्वाचा : घाटे

वृक्षारोपण करताना मातीचा अभ्यास महत्त्वाचा : घाटे

पुणे, ता. २९ : ‘‘पर्यावरण संवर्धनाचा विषय जेव्हा येतो, तेव्हा सर्वांत पहिली गोष्टी केली जाते ती अर्थात वृक्षारोपण. पण कोणत्याही पडीक जमिनीवर वृक्षारोपण करून चालत नाही. त्यासाठीदेखील त्या मातीबद्दल अभ्यास करणे गरजेचे आहे. तिच्यावर आधी काम करण्याची गरज असते, मग पुढे वृक्षारोपण साध्य होऊ शकते. ही संपूर्ण प्रक्रिया करताना ‘संयम’ या तत्त्वज्ञानाची जाणीव होते. त्यामुळे तत्त्वज्ञानाचा निसर्गाशी संबंध असल्याचे यातून दिसते,’’ असे मत न्यू एक्रोपॉलिस इंडिया संस्थेच्या (ऑइकॉसच्या) केतकी घाटे यांनी व्यक्‍त केले.
ऑइकॉसच्या पुणे शाखेच्या वतीने आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिनाच्या अनुषंगाने ‘निसर्गाच्या तत्त्वज्ञानातून धडे’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते, त्यावेळी घाटे बोलत होत्या. या प्रसंगी न्यू एक्रोपॉलिस इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष यारॉन बर्झिले, जीवितनदीच्या शैलजा देशपांडे, राजेश कुलकर्णी व शक्ती बिश्र्नोई यांनी सहभाग घेतला होता. निसर्ग व तत्वज्ञान यांच्यातील संबंध, त्याच्या संतुलनासाठी शाश्र्वत पर्याय, सजग नागरिक म्‍हणून पर्यावरणासाठी असलेली आपली भूमिका, त्यासाठी संकल्प अशा विविध गोष्टींवर यावेळी चर्चा करण्यात आली.
या वेळी यारॉन म्हणाल्या, ‘‘निसर्ग हा प्रत्येक घटकाला आधार देते. निसर्गाचे आपलेच नियम असतात आणि तत्वज्ञानाचा विचार केल्यास, निसर्गापासून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. खऱ्या अर्थाने वसुदैव कुटुंबकमचा संदेश आपल्याला निसर्गातून मिळतो. त्यामुळे निसर्गाचे संतुलन ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे. ही एक सामाजिक जबाबदारी असून त्यासाठी लोकांच्या मानसिकतेत परिवर्तन करण्याची आवश्‍यकता आहे. पृथ्वीच्या समतोलासाठी काम करताना भीतीने नाही तर प्रेमाने काम करावे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com