परंपरेची माहिती नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड : पाटील

परंपरेची माहिती नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड : पाटील

Published on

पुणे, ता. १८ : ‘‘विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच भारतीय परंपरा रुजविणे आवश्यक आहे. कारण परंपरेची माहिती नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होत आहे. तो नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून निघून जाण्यास मदत होणार आहे. या नवीन अभ्यासक्रमामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये आपल्या परंपरेविषयी अभिमान निर्माण होण्यास मदत होईल.’’ असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
स्नेहल प्रकाशनतर्फे १९० वर्षे इंग्रजांच्या अत्याचाराचा लेखाजोखा मांडणाऱ्या लेखक प्रशांत पोळ लिखित ‘विनाशपर्व’ पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (ता. १७) झाले, त्या वेळी पाटील बोलत होते. याप्रसंगी मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, उद्योजक दीपक घैसास, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे उपस्थित होते.
डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘‘देशावर अनेक आक्रमणे झाली संकटे आली तरी देखील आतापर्यंत भारतीय परंपरा टिकून आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. परंतु अभ्यासक्रमातील इतिहासात बदल झाला नाही. परिणामी खरा इतिहास शिकवला गेला नाही. त्यामुळे भारतीय इतिहासावर आधारित पुस्तके निर्माण होणे आवश्यक आहे.’’ दीपक घैसास, लेखक प्रशांत पोळ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. श्याम भुर्के यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.