‘श्री शिवरायांचे व्यवस्थापन शास्त्र’ पुस्तकाचे प्रकाशन

‘श्री शिवरायांचे व्यवस्थापन शास्त्र’ पुस्तकाचे प्रकाशन

Published on

पुणे, ता. ६ : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास म्हणजे केवळ युद्धाचा इतिहास नव्हे; तर स्वराज्य घडवताना त्यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक अशा विविध अंगाने क्रांती घडवली, याचा संपूर्ण अभ्यास म्हणजे ‘शिवचरित्र’ होय. व्यवस्थापन शास्त्राला दूरदृष्टीची जोड देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य आजही समाजाला मार्गदर्शक आहे,’’ असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
तेजपाल शहा लिखित ‘श्री शिवरायांचे व्यवस्थापन शास्त्र’ पुस्तकाचे प्रकाशन लेखक व इतिहास संशोधक महेश तेंडुलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शाहीर हेमंत मावळे, स्वातंत्र्यसैनिक वसंतराव प्रसादे आदी उपस्थित होते. बलकवडे म्हणाले,‘‘महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य आजच्या तरुणांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यात सखोल अभ्यास करून व्यवस्थापन शास्त्रामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन शास्त्र समजावून सांगण्यासाठी लेखन करण्याची गरज आहे.’’ कार्यक्रमात शहा यांनीही मनोगत व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.