जातीनिहाय जनगणना
गरजेची ः रणसिंग

जातीनिहाय जनगणना गरजेची ः रणसिंग

Published on

पुणे, ता. ३ : देशात सामाजिक समतोल राखण्यासाठी जातीनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. ‘जीसकी जितनी भागीदारी उतनी हिस्सेदारी’ या तत्त्वानुसार जातीनिहाय जनगणना करावी. तसेच आरक्षणाची मर्यादा ८० टक्क्यांपर्यंत वाढवावी, अशा मागण्या संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. रवींद्र रणसिंग यांनी केल्या. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘सध्या निर्माण झालेला आरक्षणाचा संघर्ष फक्त संसदेतच सुटू शकतो. हे वास्तव जनतेसमोर मांडून राज्यातील १० लाख नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येईल. त्या वेळी दोन हजार प्रतिनिधींचे शिष्टमंडळही नेण्यात येईल. याबाबत आम्ही राज्यभर पत्रकार परिषदा घेऊ.’’
यावेळी माजी न्यायाधीस बी. जी. कोळसे पाटील, माजी आमदार आर. जे. रूपनवर, ॲड. संदीप ताम्हनकर, किशोर सरदेसाई उपस्थित होते.
-----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.