राज्यघटना बदलण्याचा घाट हाणून पाडू

राज्यघटना बदलण्याचा घाट हाणून पाडू

पुणे, ता. ११ : ‘‘लोकशाहीला कोणीही हानी पोचवू शकत नाही. काही काळासाठी वाईट प्रवृत्तीचे लोक संविधान हातात घेऊन त्याचा गैरवापर करू शकतात. परंतु कायमस्वरूपी संविधानाला नुकसान पोचवू शकत नाही. परंतु, गेल्या १० वर्षांत संविधानाचे नुकसान करण्यात आले आहे. ते दुरुस्त करण्यासाठी एकत्र यावे लागणार आहे. आपण सर्वांच्या ताकदीनेच राज्यघटना बदलण्याचा घाट हाणून पाडू शकतो,’’ असे मत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ वकील आणि सिव्हिल सोसायटी सदस्यांच्या मेळाव्यात ‘लोकशाहीचे आधारस्तंभ व त्यांचे घटनात्मक कार्य’ याविषयावर सिंघवी बोलत होते. या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, माजी आमदार उल्हास पवार, माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, कॉम्रेड अजित अभ्यंकर आदी उपस्थित होते.
सिंघवी म्हणाले, ‘‘संसदीय लोकशाही, न्यायव्यवस्था, केंद्रीय निवडणूक आयोग यांसारख्या स्वायत्तता यंत्रणा धोक्यात आल्या आहेत. चौकशी यंत्रणेला हाताशी धरून होणाऱ्या राजकारणातून संपूर्ण लोकशाहीला वेठीस धरले जात आहे. संसदेत मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवला तर त्यांना संपविण्यासाठी ते काम करतात.’’ प्रास्ताविक छाजेड यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com