समुपदेशनातून वाढवले जातेय विद्यार्थ्यांचे धैर्य

समुपदेशनातून वाढवले जातेय विद्यार्थ्यांचे धैर्य

सनील गाडेकर
पुणे, ता. २ : मनावर झालेला आघात प्रत्येकालाच सहन होतो असे नाही. तसेच अनेकांना आपल्या मनात मशागतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे लक्षात येत नाही. त्यातूनच त्यांची मानसिक स्थिती खालावते. अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीतही असे घडते. त्यामुळेच मानसिक स्वास्थ्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘धैर्यदा’ने अनेकांना मानसिक आधार दिला आहे. यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.
पालकांचे बदललेले आयुष्य, वाढती स्पर्धा, मुलांचे कमी वयात सुटणारे बालकत्व, या सर्वांचा परिमाण मुलांच्या मानसिकतेवर होत आहे. त्यामुळे मुलांशी अधिक चांगल्या पद्धतीने कसे कनेक्ट व्हावे, त्यांच्या अपेक्षा समजून घेत त्यांना आणखी प्रेरित कसे करावे, मुलांचे विविध प्रश्‍न कशा पद्धतीने सोडवावे, यांसह विविध मुद्यांवर सिद्धीदा काबरा-बटाविया या ‘धैर्यदा’च्या माध्यमातून काम करत आहेत. याबाबत काबरा म्हणाल्या, ‘‘मी चार वर्षे अनेक महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तेव्हा मी विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता वाढविण्यासाठी काम केले. त्यातून माझ्या लक्षात आले की, विद्यार्थी सामाजिक, मानसिकदृष्ट्या सक्षम होत त्यांचे बोलण्याचे कौशल्य, त्यांच्यातील समजूतदारपणा यांसह त्यांचे एकूण व्यक्तिमत्त्व विकसित होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी मी २०२१ साली ‘धैर्यदा’ची स्थापना केली. सुरुवात केली तेव्हा युरोपमधून आमचे काम चालत. त्यानंतर मी पुण्यात येऊन काम सुरू केले. सध्या आमचे काम संपूर्ण देशभर सुरू आहे. त्यासाठी एक टिम आम्ही तयार केली असून त्याद्वारे मानसिक सुदृढ समाज तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.’’

शिक्षकांना मार्गदर्शन
पालक आणि शिक्षक हे दोन्ही घटक विद्यार्थ्यांच्या सातत्याने जवळ असतात. मुले त्यांना काय वाटते हे त्यांचे पालक आणि शिक्षकांबरोबर बोलत असतात. त्यामुळे या दोन्ही घटकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मानसिकता अधिक चांगली करण्यावर आमचा भर आहे. त्यासाठी आम्ही शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत सुधार करण्यासाठी काय आवश्‍यक आहे, याचे प्रशिक्षण देतो. आम्ही अनेक शाळा-महाविद्यालयांशी संलग्न असून त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.

मानसिक बाबींवर आपल्याकडे आजही मोकळेपणाने चर्चा होत असल्याचे मला शिकवत असताना लक्षात आले आहे. मात्र चांगल्या सामाजिक वातावरणासाठी मानसिक स्वास्थ्यावर चर्चा होणे गरजेचे आहे.
सिद्धीदा काबरा-बटाविया, संस्थापिका, धैर्यदा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com