अकरावीसाठी आज शेवटची संधी

अकरावीसाठी आज शेवटची संधी

Published on

पुणे, ता. ११ : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी आणि एटीकेटी लागू असणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी, अर्जाच्या भाग एकमध्ये दुरुस्ती करणे, अर्जांचा भाग दोन भरणे आणि प्राधान्यक्रम देणे यासाठी शुक्रवारी (ता. १२) दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत दिली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात येणारी ही अंतिम फेरी असून याअंतर्गत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची शेवटची संधी शुक्रवारपर्यंत उपलब्ध असणार आहे.
इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत राज्यातील नऊ हजार ५४४ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी १४ लाख ८३ हजार ३३ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. आतापर्यंत १३ लाख २४ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. त्यात ‘कॅप’अंतर्गत ११ लाख ५६ हजार ५८२ विद्यार्थ्यांनी, तर कोट्याअंतर्गत एक लाख ६८ हजार ६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. प्रवेशाच्या अंतिम फेरीत महाविद्यालय मिळालेल्या (ॲलॉट झालेल्या) विद्यार्थ्यांना शनिवारी (ता. १३) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com