‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या’
पुणे, ता. १९ ः पुणे विभागात चार हजारहून जास्त मतदान यंत्रे (ईव्हीएम मशिन) नादुरुस्त आहेत. त्याबाबतची माहिती उघड झाली आहे. मतदान यंत्रांची ही परिस्थिती पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर (मतपत्रिकेवर) घ्याव्यात, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी शुक्रवारी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली.
जोशी यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे याबाबत पत्र पाठविले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे आदेश दिल्यानंतर राज्य सरकार जागे झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार ते पाच वर्षांनी होत आहेत. सत्ताधारी भाजप सरकारला अपयशाची भीती वाटत असल्याने ते निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्याकडून निवडणूक यंत्रणेत गडबड केली जाऊ शकते. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील साडेपाच हजार मतदान यंत्रे नादुरुस्त आहेत. अगोदरच वोटचोरीचा प्रकार उघड होत आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी, असेही जोशी यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.