अकरावीच्या प्रवेशासाठी उद्यापर्यंत करता येणार अर्ज
पुणे, ता. २० : राज्यातील काही विद्यार्थ्यांना अद्याप इयत्ता अकरावीसाठी प्रवेश मिळू शकलेला नाही, तर काही विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले नाहीत. त्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेशासाठी २२ ते २५ सप्टेंबर दरम्यान अंतिम विशेष फेरी आयोजित केली आहे.
या प्रवेश प्रक्रियेंतर्गत १४ लाख ८५ हजार ६८६ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे तर, १३ लाख ४३ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरून अंतिमत: सहभाग नोंदविला आहे. त्यापैकी १३ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश निश्चित केलेला नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशाची पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली आहे.
त्यानुसार नवीन कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी, कोट्यातील जागा प्रत्यार्पित करणे ही प्रक्रिया सोमवारी (ता. २२) सकाळी आठ ते दहा यावेळेत करता येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश क्षमता वाढविण्याची प्रक्रियेसाठी त्याचदिवशी सकाळी १० ते ११ या वेळेत मुदत दिली आहे. तर, प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी, अर्जाच्या भाग एकमध्ये दुरुस्ती आणि अर्जाचा भाग दोन भरणे, यासाठी सोमवार आणि मंगळवारपर्यंत मुदत आहे. तर विद्यार्थ्यांना आपल्याला मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेशासाठी बुधवार (ता. २४) ते गुरुवार (ता. २५) पर्यंत मुदत दिली आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.