कौटुंबिक वादाला कंटाळून विवाहित तरुणाची आत्महत्या
पुणे, ता. २२ : सततचा कौटुंबिक वाद, पत्नीची वेगळे राहण्याची मागणी आणि पोलिसांकडे केलेल्या तक्रारींना कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येरवड्यात घडली. या प्रकरणी मृत तरुणाच्या पत्नीसह तिच्या आईवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय विजय साळवे (वय २४, रा. श्रीगणेशनगर, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत तरुणाच्या आईने (वय ५२) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अक्षयची पत्नी (वय २४) आणि तिच्या आईविरुद्ध (मूळ रा. गेवराई, जि. बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयची पत्नी ही लग्नानंतरपासूनच वेगळे राहण्याची मागणी करत होती. ती वारंवार विनाकारण पोलिसांकडे खोट्या तक्रारी करीत असे. रात्री फोनवर अक्षयने आईला पत्नीशी पुन्हा भांडण झाल्याचे सांगितले. मात्र, दुसऱ्या दिवशी १९ मे रोजी सकाळी अक्षयने घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या सततच्या वादाला कंटाळूनच मुलाने टोकाचा निर्णय घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, अक्षयने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पत्नीच्या सततच्या भांडणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.