खडकवासला कालव्यातून छटपूजेसाठी जादा पाणी
पुणे, ता. २६ : उत्तर भारतीय समुदायाच्या महत्त्वाच्या छटपूजेसाठी खडकवासला धरणातून कालव्यात जादा पाणी सोडण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. विखे पाटील यांनी ही मागणी तत्काळ मान्य केल्यामुळे छटपूजेसाठी जादा पाणी उपलब्ध होणार आहे.
उत्तर भारतीय समाजात छटपूजेला अत्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. सोमवार (ता. २७) आणि मंगळवारी (ता. २८) छटपूजा असल्याने उत्तर भारतीय नागरिकांना नदी किंवा कालव्याच्या ठिकाणी जमून सूर्याला अर्ध्य देण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. हडपसर, वानवडी, औंध आणि बालेवाडी परिसरात उत्तर भारतीय नागरिकांची संख्या मोठी असल्याने या ठिकाणी कालव्याकाठी छटपूजा केली जाते. या पार्श्वभूमीवर जोशी यांनी विखे पाटील यांच्याशी संपर्क साधून खडकवासला धरणातून कालव्यात दोन दिवसांसाठी जादा पाणी सोडण्याची मागणी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

