‘मनाचे श्लोक’, ‘सूर्यनमस्कार’ स्पर्धांचे आयोजन
पुणे, ता. ३० : ‘समर्थ भारत अभियान’ आणि ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धा आणि ‘सूर्यनमस्कार’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने ‘मन आणि मनगट’ या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा आहे, अशी माहिती समर्थ भारत अभियानचे राजीव नगरकर आणि ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे संजीव जावळे यांनी दिली.
नगरकर म्हणाले, ‘‘या स्पर्धा १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारीदरम्यान होणार असून, प्राथमिक फेरी शाळास्तरावर घेतली जाईल. त्यानंतर आंतरशालेय फेरी आणि राज्यस्तरीय अंतिम फेरी फेब्रुवारीच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात पार पडेल. ‘मनाचे श्लोक’ ही वैयक्तिक, तर ‘सूर्यनमस्कार’ ही सांघिक स्पर्धा असून, बालवाडीपासून ते पालक-शिक्षक गटांपर्यंत विविध वयोगटांसाठी स्पर्धा खुल्या राहणार आहेत.’’
प्रत्येक गटातील विजेत्यांना प्रथम तीन व उत्तेजनार्थ दोन अशी बक्षिसे देण्यात येतील. या स्पर्धा सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, अकोला, वाशीम, धाराशिव, लातूर, संभाजीनगर, नाशिक, सातारा, कराड, रत्नागिरी, उल्हासनगर, बदलापूर, मुलुंड, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे आणि पिंपरी चिंचवड या विभागात होणार आहेत. मनावर संस्कार आणि शरीरात बळ या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचे नगरकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

