‘महारवतन जमीन प्रकरणातील 
मुखत्यारपत्र रद्द करावे’

‘महारवतन जमीन प्रकरणातील मुखत्यारपत्र रद्द करावे’

Published on

पुणे, ता. ८ : मुंढवा येथील जमिनीवर सरकारने वनस्पती उद्यानाचे आरक्षण केले असले, तरी प्रत्यक्षात ती जमीन मूळ महार वतनदारांची आहे. त्यामुळे सरकारने ती जमीन परत मूळ महारवतनदारांच्या नावावर करावी, तसेच या जमिनीच्या खरेदी प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्यांवर ‘अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या’नुसार (ॲट्रॉसिटी ॲक्ट) कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अरविंद तायडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव वाघमारे, संकेत गायकवाड, विशाल कांबळे, प्रकाश ढाले, कालिदास गायकवाड, नितीन गायकवाड, प्रथम गायकवाड आदी उपस्थित होते. तायडे म्हणाले, ‘‘महारवतन जमीन ही ब्रिटिशकालीन वतनप्रथेनुसार महार समाजाला सेवा मोबदल्यात देण्यात आलेली होती. वतनदारांच्या अज्ञानाचा आणि गरिबीचा फायदा घेत, शीतल तेजवानी यांनी ‘समाजसेविका’ असल्याचे भासवून २००६ मध्ये वतनदारांकडून आम मुखत्यारपत्र करून घेतले. ही फसवणूक लक्षात येताच २००८ मध्ये वर्तमानपत्रात खुलासा करून, मुखत्यारपत्र रद्द करण्याची प्रक्रिया वतनदारांनी केली.’’
---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com