सत्ताधाऱ्यांकडून आचारसंहितेची पायमल्ली ः गोपाळ तिवारी

सत्ताधाऱ्यांकडून आचारसंहितेची पायमल्ली ः गोपाळ तिवारी

Published on

पुणे, ता. १७ : महायुती सरकारकडून निवडणूक आचारसंहिता आणि नैतिक मूल्यांची सर्रास पायमल्ली होत असून सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली निवडणूक आयोग निष्क्रिय भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला. आयोगाने सत्ताधाऱ्यांना किमान आचारसंहिता भंगाच्या नोटिसा पाठवून आपली स्वायत्तता सिद्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली.
तिवारी म्हणाले, ‘‘विकासाच्या नावाखाली सतत धूळफेक करणाऱ्या महायुती सरकारने कोट्यवधी रुपयांच्या तथाकथित विकासाच्या घोषणांसाठी जाणीवपूर्वक महापालिका निवडणुकांची घोषणा लांबवली. सरकारी खर्चाने कार्यक्रम आयोजित करून निवडणूक जाहीर होण्याआधीच विकासाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सर्व सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली निवडणूक आयोगाकडून होत आहे.’’
ऐन निवडणूक जाहीर होण्याच्या वेळेस विकासाचा आभास निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाची घोषणा आणि वेळेचे ‘टायमिंग’ साधले जाते. ही बाब आचारसंहिता आणि संविधानिक मूल्यांना तिलांजली देणारी असून सत्ताधारी पक्षाच्या नैतिक घसरणीचे चित्र असल्याची टीका त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com