चातुर्मास विशेष प्रवचन १
जे आहे त्यात आनंदी जगा
प्रवीणऋषीजी म. सा.
आपल्याला जे मिळालं आहे, त्यात समाधान मानायला शिका. जे नाही मिळालं त्याचं दुःख करत बसण्यात काही उपयोग नाही. ते तिथेच सोडून द्या. नाहीतर मनात कायमची सल राहते आणि त्यामुळे निद्रानाश होतो. आपल्या दैनंदिन आयुष्यात झोप ही सर्वांत सोपी आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे; पण आज झोप लागण्यासाठीही प्रयत्न करावे लागतात, गोळ्या घ्याव्या लागतात. ही योग्य पद्धत नाही. जी गोष्ट नैसर्गिकरीत्या व्हायला हवी, ती जबरदस्तीने घडवण्याचा प्रयत्न म्हणजे शरीरावर अन्यायच आहे. झोप येत नसेल तर त्यामागचं कारण शोधायला हवं. गोळी घेऊन शरीराला झोपवण्यापेक्षा मन शांत करून झोपायला जाणं अधिक योग्य आहे. दिवसभरात जे चांगलं-वाईट घडतं, त्याचाच वारंवार विचार आपण करत बसतो. पण गेलेलं पुन्हा परत येत नाही. मग त्यात अडकून राहण्यात काही अर्थ नाही. रात्री अंधारात दुःख, खेद आणि नकारात्मक विचार करत बसणं म्हणजे स्वतःला नरकयातना देण्यासारखे आहे. मन शांत ठेवा आणि जे आहे त्यात आनंदी जगा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.