

Vegetable Prices Surge in Dubai as Imports Temporarily Stop
esakal
-हरिदास कड
चाकण : मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम दुबईच्या भाजीपाला बाजारावर दिसू लागला आहे. वाढत्या युद्ध तणावामुळे काही देशांतून होणारी विशेषत: भारतातून होणारी कांदा, बटाटा, टोमॅटो भाजीपाल्याची आयात तात्पुरती थांबली आहे .त्यामुळे टोमॅटो दहा दिरहाम, भारतीय चलनानुसार प्रतिकिलो अडीचशे रुपये, कांदा सात दिरहाम भारतीय चलनानुसार प्रति किलो पावणे दोनशे रुपये अशी पन्नास टक्के भावात वाढ झाली आहे. परंतु भारतातून निर्यात ठप्प झाल्यामुळे किमतींमध्ये वाढ झाली आहे.