
शिरूर : ऑपरेशन सिंदुर मार्फत भारतीय सैन्यदलाने केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचा गौरव आणि कठीण परिस्थितीत भारतीय नागरीकांच्या मनात देशभक्तीची भावना रूजविण्याच्या उद्देशाने शहरातून आज भर पावसात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम', 'जय जवान जय किसान म' चा गजर करीत निघालेल्या या पदयात्रेत सर्व राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक आणि सर्वधर्मिय नागरीक, महिला तिरंगी झेंडे घेऊन सहभागी झाले होते.