
Uddhav Thackeray
Sakal
पुणे : संघटनेची बांधणी भक्कम होत नाही, तोपर्यंत सभेला रिकाम्या खुर्च्या असूनही विरोधक जिंकले कसे ? आणि भरलेले मैदान असूनही आपण हरलो कसे ? याचे उत्तर तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येक बूथ प्रमुखाने शिवसेनेचे काम घरोघरी पोहोचविले पाहीजे. बूथ प्रमुख व गटप्रमुख यांच्या यंत्रणेची बांधणी अधिक मजबूत करावी लागेल, असे केले तरच पुढील 25 वर्ष आपल्या सत्तेला कोणी धक्का लावू शकणार नाही, ' असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केला.