Pune : स्पीकर लावून फळ, भाजीपाला विक्री करणाऱ्यांसाठी रस्ता आहे का ?

पथारीवाले यांच्यावर कडक कारवाई करण्याचे काम सातत्याने सुरू ; वाहनचालकांचा संतप्त सवाल
Pune
Pune Sakal

उंड्री : फेरीवाले, पथारीवाले, खाद्यपदार्थ विक्रेत्यांबरोबर आता स्पीकर लावून छोटा हत्ती आणि टेम्पोची भर पडली आहे. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत, तर पादचारी जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. रस्ता वाहतुकीसाठी आहे पथारी-फेरीवाले आणि टेम्पोवाल्यांसाठी आहे, असा संतप्त सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

सय्यदनगर रेल्वे गेट क्र.७, काळेबोराटेनगर, ससाणेनगर भुयारी मार्ग, हांडेवाडी रस्ता, महंमदवाडी दरम्यानचा रस्ता अतिक्रमणामुळे अरुंद झाला आहे. त्यातच आता खाद्यपदार्थांच्या हातगाड्या आणि फेरीवाल्यांबरोबर टेम्पोची भर पडली आहे. त्यामुळे या रस्त्याने वाहने चालवायचीच नाही का, अशी विचारणा संजय कुदळे, शराफत शेख, विनिता थोरात, अशोक शेवाळे, संतोष सातव, श्वासवत जाधव यांच्यासह पादचारी वाहनचालकांनी केली आहे.

दरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त प्रसाद काटकर म्हणाले की, फ्रंट मार्जिनवर अतिक्रमण कऱणाऱ्या दुकानदारावर, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या, फेरीवाले, पथारीवाले यांच्यावर कडक कारवाई करण्याचे काम सातत्याने सुरू आहे.

महापालिकेच्या पदथविभागातील अधिकारी-कर्मचारी कारवाई करण्यासाठी मुहूर्त पाहतात की, सर्वसामान्यांचा नाहक बळी जाण्याची वाट पाहात आहे. पालिका प्रशासनाकडे तक्रार केली, तर अधिकारी परस्पर तक्रारी बंद करतात, पथविभागाकडे तक्रार करा, रस्ते विभागाकडे तक्रार करा, फोटो पाठवा, लोकेशन पाठवा, तुम्हाला एकट्यालाच त्रास होतो काय, इतरांना होत नाही, अशी विचारणा अधिकाऱ्यांकडून केली जाते.

-दिलीप ननावरे, दुचाकीचालक

पदपथचा ७-१२ दुकानदार आणि फेरीवाले-पथारीवाल्यांच्या नावावर करून दिला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीतून वाट काढत चालायचे, असा अलिखित नियमच झाला आहे.

-अशोक जाधव, सेवानिवृत्त

खाद्यपदार्थ्यांच्या हातगाड्या, भोंगे लावून लसून, कांदा, फळ विक्री करणाऱ्यांचे टेम्पो भोंगे लावून अर्ध्या अधिक रस्त्यात असतात. शाळा-महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाहतूककोंडीमध्ये एखाद्या वाहनाचा धक्का लागला किंवा वाहन बाजूला घ्यायला सांगितले तर ही मंडळी थेट अंगावर धावून येतात.

-दिनेश डिसुझा, पादचारी

अतिक्रमण विभागाकडे वारंवार तक्रार केली, तर सरकारी कामात अडथळा आणत असल्याचे कारण देत गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात. अधिकारी-कर्मचारी थेट तक्रारदाराचे नाव फेरीवाले-पथारीवाले, टेम्पोवाल्यांना सांगतात. अतिक्रमणच्या विळख्यामुळे कार, बस, ट्रकच्या गर्दीत दुचाकी चालवता येत नाही.

- अर्चना बनकर, दुचाकीचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com