

Union Budget impact on Indian industry
sakal
पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पाने आर्थिक स्थैर्य राखत दीर्घकालीन विकासाचा स्पष्ट मार्ग मांडला आहे. पायाभूत सुविधा, ऊर्जा, सेमीकंडक्टर, बायोफार्मसी आणि एमएसएमई क्षेत्रासाठी केलेल्या भरीव तरतुदींमुळे उद्योगविश्वात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आयात-निर्यात धोरण, जीएसटी सुधारणा व सिमाशुल्क प्रक्रियेतील सुलभता यामुळे सोप्या पद्धतीने उद्योग करण्यास गती मिळेल, असा सूर मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए)च्या चर्चासत्रात उमटला.