Uruli Kanchan News : उरुळी कांचनकरांना घरपट्टीत ५० टक्के सवलतीचा दिलासा हवा; ‘समृद्ध पंचायतराज अभियान’अंतर्गत मागणी!

House Tax Relief : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उरुळी कांचनमधील नागरिकांनी थकीत घरपट्टीत ५० टक्के सवलत देण्याची मागणी केली आहे. ग्रामसभेच्या ठरावामुळे सवलत नाकारली गेल्याने विशेष ग्रामसभा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Demand for 50% House Tax Relief in Uruli Kanchan

Demand for 50% House Tax Relief in Uruli Kanchan

sakal
Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : उरुळी कांचन गावाच्या हद्दीतील निवासी मालमत्ता धारकांना शासन निर्णयाप्रमाणे "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत" निवासी मालमत्तेच्या घरपट्टीत व अन्य करांच्या थकबाकीत ५० टक्के सवलत देण्याची मागणी असंख्य नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचेकडे केली आहे.शासन निर्णय क्रमांक व्हीपीएम-२०२५/प्र.क्र.६२ पंरा -१ दि.१३/११/२०२५ नुसार राज्यातील ग्रामपंचायतच्या थकीत घरपट्टी व अन्य इतरांवर ५०% माफी देऊन त्याची वसुली वा भरणा करण्यासाठी ३१ डिसेंबर ही मुदत ग्रामपंचायतीना दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com