पुणे : वल्लरी प्रकाशन यांच्या वतीने संध्या राजन यांचा 'नातिचरामी' आणि व्यंकटेश कल्याणकर संपादित ' मोगरा ' या दोन आशयसंपन्न पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
रविवार दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे.
यावेळी प्रकाशन समारंभाच्या अध्यक्ष ज्येष्ठ कवयित्री संगीता बर्वे, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी आणि ज्येष्ठ संपादक विद्याधर ताठे उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचाः एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
दीपा केळकर, पौर्णिमा ढेरे, मृण्मयी नारद, रूपाली इनामदार, सरोज भट्टू, छाया नाळे, संध्या राजन, वर्षा जोशी, जया जोशी, आरती परळकर ,स्वाती कुलकर्णी या प्रतिभावंत कवयित्रींचा मोगरा हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह आहे.
"नातिचरामी" हा संध्या राजन यांनी सरळ आणि ओघवत्या लेखन शैलीतून सहजतेने साकारलेला कथासंग्रह आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.