
पुणे : सतत पडणाऱ्या पावसामुळे सर्व प्रकारच्या पालेभाज्या खराब झाल्या आहेत. पितृपक्षामुळे पालेभाज्यांना बाजारात मागणी आहे. त्यामुळे कोथिंबीरीच्या एका जुडीला ४० ते ५० रुपये तर इतर भाज्यांचे जुडीचे दर २० ते ४० रुपयांवर पोहोचले आहेत. बाजारात मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे. त्यात पावसामुळे खराब भाज्या बाजारात येत आहेत. ज्याठिकाणी पाऊस कमी झाला आहे, त्या ठिकाणावरून काही प्रमाणात दर्जेदार पालेभाज्यांची आवक होत आहे. मात्र, हे प्रमाण अवघे वीस तर पंचवीस टक्केच आहे. पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील सासवड परिसर, हडपसर, उरळी कांचन, लोणी काळभोर, यवत परिसरात पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तेथून शहरात पालेभाज्या विक्रीसाठी पाठविल्या जातात.
मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू आहे. त्यामुळे खराब भाज्याचे प्रमाण वाढले आहे. मार्केटयार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीची १ लाख २५ हजार जुडी व मेथीची ५० हजार जुडी आवक होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक टिकून आहे.
पावसामुळे पालेभाज्यांच्या खराब झाल्या आहेत. बाजारात येणाऱ्या भाज्यांचा दर्जा खालवला आहे. त्यात पितृपक्ष सुरू असल्याने मागणी जास्त आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे भाव तेजीत आहेत.
- प्रकाश ढमढेरे, किरकोळ भाजी विक्रेते
पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे भाव (२० सप्टेंबर)
- कोथिंबीर - ४० ते ५० रुपये
- मेथी - २५ ते ३० रुपये
- पालक - ३० ते ४० रुपये
- चुका - २० ते २५ रुपये
- पुदिना - १० ते १५ रुपये
- शेपू - २० ते २५ रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.