वेल्हे, (पुणे) - रायगड व राजगड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या दुर्गम अशा निगडे खुर्द (ता. राजगड) येथील नागरिकांच्या मूलभूत समस्या अद्यापही तशाच असल्याने येथील नागरिकांचे मरणानंतर स्मशान भूमी नसल्याने हाल होत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे..किल्ले तोरणागडाच्या दक्षिणेकडे असलेल्या अठरागाव मावळ परिसरातील राजगड तालुक्याचे शेवटचे गाव म्हणजे निगडे खुर्द या गावातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षापासून आमदारापासून ते जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्यांपर्यंत वारंवार मागणी करूनही स्मशानभूमी मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे..शुक्रवार (ता. 22) रोजी मृत सावित्रीबाई श्रीपती शिंदे यांचा अंत्यविधी करताना जोरदार पाऊस सुरू होता यावेळी ग्रामस्थांनी जळत असलेला मृतदेह विझू नये म्हणून त्यावरती लोकांच्या सहाय्याने ताडपत्री धरून मृतदेह जाळत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.याबाबत बोलताना निगडे खुर्द येथील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भावळेकर म्हणाले, 'येथील ग्रामस्थांच्या मरणानंतर सुद्धा यातना सुरू असून गेल्या महिनाभरात गोविंद सखाराम शिंदे, माजी सैनिक गोविंद रामचंद्र जाधव, व शुक्रवारी सावित्रीबाई श्रीपती शिंदे असे तीन मृत्यू झाले असून भर पावसामध्ये अंत्यविधी करावा लागत आहे..जळताना मृतदेह विझु नये म्हणून नागरिकांकडून याच्यावरती ताडपत्री पकडून थांबावे लागत आहे. याबाबत गेल्या अनेक वर्षापासून आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही स्मशानभूमीसाठी निधी मिळत नसल्याने नागरिकांचे मरणानंतर सुद्धा हाल होत आहेत..याबाबत केळद ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अश्विनी भावळेकर म्हणाल्या, 'निगडे खुर्द गावामध्ये स्मशानभूमीसाठी अनेक वर्षापासूनची मागणी असून त्यासाठी निधी मिळाला नाही. याबाबत विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.