शिवाजीनगर - वैदूवाडी आणि आशानगर भागात महापालिकेच्या पाणीपुरवठा वाहिनीतून आळ्यांचे पाणी येत असल्याने परिसरातील महिलांनी पाण्याच्या टाकीजवळ एकत्र येऊन थाळ्या वाजवून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला..सेनापती बापट रस्त्यावरील वैदूवाडीत आठ ते दहा कुटुंबांना आळ्यांसह पाणी आले. 'यापूर्वी येथे सकाळी व रात्री अशा दोन वेळा पाणीपुरवठा होत असे. मात्र सध्या केवळ सकाळी एकदाच पाणी येत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले..स्थानिक रहिवासी आयुष जाधव म्हणाले, 'सध्या सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान पाणीपुरवठा होतो. शुक्रवारी (ता.१२) आलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर आळ्या होत्या.' तर प्रविण डोंगरे म्हणाले, 'फक्त वैदूवाडीच नव्हे तर संपूर्ण गोखलेनगर, जनवाडी, जनतावसाहत या भागांमध्ये दूषित आणि अनियमित पाणीपुरवठ्याची समस्या आहे. प्रशासनाने हा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.'.महापालिकेचे स्पष्टीकरण'एप्रिल महिन्यात पाण्याची टाकी स्वच्छ केली होती. आता पुन्हा स्वच्छता करणार आहोत. सांडपाणी व पिण्याच्या पाण्याची वाहिनी एकाच ठिकाणी असल्याने आळ्या पाण्यात आल्या असाव्यात. आम्ही तपास करून हा प्रश्न लवकरच मार्गी लावू.'- केदार साठे, उपभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.