डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याला गळती

डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याला गळती

नारायणगाव : डिंभे डावा कालव्याच्या गळतीचे पाणी येथील वारुळवाडी- गुंजाळवाडी रस्त्यावर साठल्याने या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले आहे. गळतीचे पाणी उभ्या पिकात साठल्यामुळे पिकांचे नुकसान झाले असून कालव्या लगतची शेती नापीक होण्याचा धोका आहे.कुकडी पाटबंधारे विभागाने या भागातील गळती थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी.आशी मागणी वारुळेमळा, गुंजाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच विकास दरेकर, उपसरपंच परशुराम वारुळे यांनी केली आहे.

डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याला गळती
पुणे जिल्ह्यात जूनमध्ये १६६ मिलिमीटर पाऊस

जुन्नर, आंबेगाव तालुक्याला जोडणारा डिंभे डावा कालवा ५५ किलोमीटरवर लांबीचा आहे. अवर्तन कालावधीत डिंभे धरणातील पाणी येडगाव धरणात सोडण्यासाठी प्रामुख्याने या कालव्याचा वापर केला जातो. कालव्याची वहन क्षमता१२४४ क्यूसेक्स आहे. मात्र सिमेंटचे अस्तरीकरण खचल्याने कालव्याची दुरवस्था झाली आहे.मागील दहा वर्षात हा कालवा अनेक वेळा फुटला असून कालव्यावरील पूल व पुलावरील अतिवाहकाच्या भिंती जीर्ण झाल्याने धोकादायक झाल्या आहेत.या मुळे कालव्याची वहन क्षमता कमी झाली असून कालव्यात ५०० क्यूसेक्स पेक्षा जास्त पाणी सोडता येत नसल्याने अवर्तन पूर्ण होण्यास अडचण येत आहे.वहन क्षमता कमी झाल्याने अवर्तन पूर्ण करण्यासाठी कालव्यात सहा महिने पाण्याचा प्रवाह राहतो. या मुळे कालव्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊन पाण्याचा अपव्यय होत असून कालव्या लगतच्या उभ्या पिकात पाणी साठत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याला गळती
सुप्रियाताई, दादांच्या मताशी सहमत नाहीत का? पुणे महापौरांचा सवाल

दरम्यान, या बाबत कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ कार्यालयात अनेक वेळा शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र कायम स्वरूपी उपाययोजना केली जात नाही. सध्या कालव्यात ५०० क्यूसेक्सने पाणी सुरू आहे.मागील आठ दिवसांत कालव्याची गळती वाढल्याने शेतात साठलेले पाणी वारुळवाडी - गुंजाळवाडी रस्त्यावरून वाहू लागले आहे. या मुळे या रस्त्याला ओढ्याचे स्वरुप आले आहे.सततच्या पाण्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून केलेला डांबरी रस्ता खराब होणार आहे.कालवा गळतीचे पाणी शेतात साठल्याने वारुळेमळा, ढवळेमळा, वायकरमळा परिसरातील सुमारे पन्नास एकर क्षेत्रातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशी माहिती डॉ. प्रणेश ढवळे यांनी दिली.

कालव्याची गळती होत आहे ही वस्तुस्थिती आहे. निधी उपलब्ध होताच गळती थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. कालव्या लगत साठलेले गळतीचे पाणी उपसण्यासाठी तात्पुरती उपाय योजना केली आहे.

-प्रशांत कडूसकर ( कार्यकारी अभियंता: कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ ,

डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याला गळती
पुणे महापालिकेने काल अमानवीय काम केलं - संजय राऊत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com