शेतकरी संघटना कमकुवत करण्यासाठी शेट्टींना खासदार तर खोतांना मंत्री केले : रघुनाथ पाटील

शेतकरी संघटना कमकुवत करण्यासाठी शेट्टींना खासदार तर खोतांना मंत्री केले : रघुनाथ पाटील

भिगवण : राज्यामध्ये २००४ पुर्वी शेतकरी संघटना अतिशय मजबुत होती व ऊसाचा तसेच शेतीमालाचा भाव ठरवत होती. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या  संघटनेमध्ये फुट पडल्यामुळे ऊसाला देण्यात येत असलेल्या एफआरपीचेही सध्या तुकटे पडु लागले आहेत. शेतकऱ्यांच्या संघटनाची ताकद माहित असलेल्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या संघटना कमकुवत करण्यासाठी राजु शेट्टींना खासदार तर खोतांना मंत्री केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ पाटील 
यांनी केला.

शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित जनप्रबोधन यात्रेनिमित्त येथील शिवरत्न मंगल कार्यालयांमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक प्रकाश ढवळे होते तर शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपेट, 
क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदखिले, जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते, गुलाबराव फलफले, हनुमंत कन्हेरकर, निळकंठ शिंदे, सुनिल कन्हेरकर, सतीश मोरे, रवींद्र एकाड, अंकुश ननवरे, हनुमंत वीर उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले, ''सरकार ऊसावर प्रतिटन चार हजार रुपये कर आकारते परंतु ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टनाला चार हजार रुपये देताना मात्र सरकार व कारखानदारांचे हात कापतात. सध्याच्या सरकारमध्येच कारखानदारांचे प्रतिनिधी बसलेले आहेत. त्यामुळे एफआरपी बाबतही अनिश्चतता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रावरील शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसल्याशिवाय व शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव तर ऊसाला प्रतिटन चार टन मिळवुन दिल्याशिवाय शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही.

यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपेट म्हणाले, ऊसाला गुजरातमध्ये पाच हजार, उत्तर प्रदेश व पंजाबमध्ये तीन हजार तीनशे दर मिळतो तर मग महाराष्ट्रातच दोन हजार आठशे रुपये का? ऊस दरासाठी केलेल्या आंदोलनांमध्ये राज्यातील २९ शेतकरी शहिद झाले आहेत तरीही जाग येत नाही हे दुदैव आहे.हमी भाव ही तर शेतकऱ्यांची दिशाभुल आहे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळाला तर शेतकरी आत्महत्या थांबतील.

यावेळी प्रकाश ढवळे, शिवाजी नांदखिले,सरगम माने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पांडुरंग रायते यांनी केले सुत्रसंचालन सुनिल कन्हेरकर यांनी केले तर आभार रवींद्र एकाड यांनी मानले. कार्यक्रमासाठी दौंड, इंदापुर, करमाळा आदी भागातील शेतकरी उपस्थित होते.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com