आंबेठाण : खेड तालुक्यातील प्रमुख प्रलंबित प्रश्नापैकी मुख्य प्रलंबित असणारा प्रश्न म्हणजे भामा आसखेड प्रकल्प बाधितांचा पुनर्वसन प्रश्न. जवळपास तीस वर्षांपासून बाधित शेतकरी पुनर्वसन व्हावे यासाठी लढा देत आहेत. त्यासाठी अलीकडच्या काळात सातत्याने आक्रमक आंदोलन करून हा लढा सुरू आहे.
कित्येक सरकारे आली आणि गेली, आमदार, खासदार बदलले पण, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करून स्वत:चा स्वार्थ साधण्यापलीकडे काही झाले नाही. ज्यांच्या त्यागावर हे धरण उभे राहिले त्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मात्र आजही कायम आहेत ही शोकांतिका आहे. एक बळी, शेकडोंचा तुरुंगवास आणि हजारोंचा आंदोलनास पाठिंबा असूनही प्रकल्पग्रस्तांच्या हातात फारसे काही पडले नाही अशी परिस्थिती या आंदोलनाची झाली आहे.
प्रमुख घडामोडी-
या आहेत प्रमुख मागण्या-
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र शेतकऱ्यांना जमीन वाटप करावे, अपात्र शेतकऱ्यांना योग्य पॅकेज द्यावे न्यायालयाच्या आदेशानुसार वाटप करण्यात आलेल्या जमिनींचे ताबे मिळावेत, बाधित गावांना नागरी सुविधा मिळाव्यात. १८ व २८ सेक्शन अंतर्गत वाढीव पेमेंट लवकर मिळावे, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ३९९ शेतकऱ्यांचे तत्काळ पुनर्वसन करावे, प्रकल्पग्रस्त नागरिकांना नोकऱ्या, पाणी परवाने आणि प्रकल्पग्रस्त दाखले द्यावेत,तीन टीएमसी पाणी धरणग्रस्तांसाठी राखीव ठेवावे आणि पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने धरणग्रस्ताच्या पुनवर्सनाची जबाबदारी घ्यावी.
आंदोलकांना नाही राजाश्रय :
प्रकल्पग्रस्तांनी निःपक्ष आंदोलन सुरु केले होते. त्यानंतर त्यांनी बाबा आढाव आणि लक्ष्मण पासलकर यांची मदत घेतली. त्यांच्या काही बैठका सुद्धा झाल्या,पण नंतर हे दोन्ही नेते आंदोलनात दिसले नाही. आजी-माजी आमदारांनी वेळोवेळी सोयीची भूमिका घेतली, पण कधीही ठामपणे आंदोलकांच्या मागे राहिले असे चित्र दिसले नाही. भाजपचे नेते देखील जरा हातचे राखून राहिले. यावरून आंदोलकांना राजाश्रय मिळाला नसल्याची बाब अधोरेखित होते पण, याला आंदोलकांची धरसोड वृत्ती कारणीभूत असल्याचे राजकीय नेते खाजगीत सांगतात.
आजी-माजींनी झुलविल्याचा आरोप -
''विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी उपोषणाला बसलेल्या आंदोलकाना सन्मानजनक तोडगा निघाला नाही तर मी स्वतः आंदोलकांसमवेत आंदोलनात असेल ''असे सांगून उपोषण सोडायला लावले पण त्यानंतर त्यांनी भूमिका बदलली असा प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे. दुसरीकडे, माजी आमदार सुरेश गोरे यांनी मुख्यमंत्री आमचा असून त्यांच्या समवेत बैठक लावू , असे आश्वासन दिले होते आणि मागण्याबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलकांसमवेत उतरण्याचा इशारा दिला होता. त्याबाबत पत्रकार परिषद घेतली होती पण, हा इशारा फुसका बार निघाला असून दोन्ही नेत्यांच्या घोषणा हवेत विरल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.