लॉकडाउननंतर पालक लगेचच मुलांना शाळेत पाठविणार का? पाहा सर्व्हे काय म्हणतोय!

Child
Child

पुणे : लॉकडाउननंतर शाळा सुरू झाल्यास लगेचच मुलांना शाळेत पाठविण्यास ९२ टक्के पालक तयार नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘पॅरेंट्स सर्कल’च्या वतीने यासंदर्भात देशव्यापी सर्वेक्षण करण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या सर्वेक्षणात देशातील १२ हजार, तर पुण्यातील ३०० पालकांनी सहभाग नोंदविला. बर्थडे पार्टी, रेस्टॉरंट, सहली, सिनेमा टाळण्यावर भर असेल, असे बहुतांश पालकांचे म्हणणे आहे. तसेच यंदा कौटुंबिक सहली रद्द करण्याचा निर्णय ५७.४३ टक्के पालकांनी घेतला आहेत. तर मॉल आणि थिएटरमध्ये जाणार नसल्याचे ५०.०३ टक्के पालकांनी म्हटले आहे.

येत्या शैक्षणिक वर्षात माझा मुलगा पाचवीला जाणार आहे. लॉकडाउन संपल्यानंतर त्याला शाळेत पाठवायचे की नाही ठरविणार आह. लॉकडाउननंतर निदान चार महिने तरी आम्ही हॉटेल, बाग, सिनेमागृह किंवा मॉलमध्ये जाणे टाळणार आहोत. 
- विशाखा राजगुरव, पालक, पुणे स्टेशन

एका वर्गाचे दोन विभाग करून त्याप्रमाणे तासांचे नियोजन करण्यात येईल. सध्या वर्षाचे वेळापत्रक बनविण्यात येत आहे. त्यानंतर ‘सोशल डिस्टन्सिंग’चा विचार करून नियोजन केले जाईल. 
- नेहा पेंढारकर, मुख्याध्यापिका, नूतन मराठी विद्यालय (मुलींची)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com