Deafness In Babies: बाळ आवाजाच्या दिशेने लक्ष देत नसेल, बोलण्याचा प्रयत्न करत नसेल तर ते जन्मतः: बहिरे असू शकते. त्यामुळे ऐकू येते की नाही याची श्रवणदोष चाचणी करून घ्यावी. बाळ कर्णबधिर असल्यास बोलण्याचाही विकास होत नाही. .या समस्येवर मात करण्यासाठी अद्ययावत उपचारपद्धती उपलब्ध आहेत. त्यासाठी लवकरात लवकर कान, नाक, घसा तज्ज्ञांकडून बाळाची तपासणी करून घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात..दरवर्षी तीन मार्च रोजी ‘जागतिक श्रवण दिन’ पाळला जातो. 2007 पासून हा उपक्रम सुरु झाला. श्रवण प्रक्रियेबाबत जनजागृती करण्याचा यामागील उद्देश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात लोकसंख्येच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त (अंदाजे 43 कोटी) नागरिक कमी श्रवणशक्तीमुळे बाधित आहेत..2050 पर्यंत 70 कोटींहून जास्त व्यक्तींची म्हणजे दहापैकी एकाची श्रवणशक्ती कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्याची गरज संघटनेने व्यक्त केली आहे..जन्मानंतर निदान व्हावेयाबाबत अधिक माहिती देताना रूबी हॉल क्लिनिकच्या कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. गौरी बेलसरे यांनी सांगितले की, ‘बाळाच्या जन्मानंतर त्याला ऐकू येते की नाही याचे निदान व्हायला हवे. त्यासाठी रुग्णालयात ‘ओएई’ ही चाचणी करून घ्यावी. एक लाख पैकी एक ते दोन बालके जन्मतः कर्णबधिर असू शकतात. याचे वेळीच निदान झाले तर एका वर्षानंतर त्यांच्यावर ‘कॉक्लियर इम्प्लांट’ ही शस्त्रक्रिया करता येते. त्यामुळे बाळाला ऐकायला येऊन ते बोलूही शकते.’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Deafness In Babies: बाळ आवाजाच्या दिशेने लक्ष देत नसेल, बोलण्याचा प्रयत्न करत नसेल तर ते जन्मतः: बहिरे असू शकते. त्यामुळे ऐकू येते की नाही याची श्रवणदोष चाचणी करून घ्यावी. बाळ कर्णबधिर असल्यास बोलण्याचाही विकास होत नाही. .या समस्येवर मात करण्यासाठी अद्ययावत उपचारपद्धती उपलब्ध आहेत. त्यासाठी लवकरात लवकर कान, नाक, घसा तज्ज्ञांकडून बाळाची तपासणी करून घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात..दरवर्षी तीन मार्च रोजी ‘जागतिक श्रवण दिन’ पाळला जातो. 2007 पासून हा उपक्रम सुरु झाला. श्रवण प्रक्रियेबाबत जनजागृती करण्याचा यामागील उद्देश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात लोकसंख्येच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त (अंदाजे 43 कोटी) नागरिक कमी श्रवणशक्तीमुळे बाधित आहेत..2050 पर्यंत 70 कोटींहून जास्त व्यक्तींची म्हणजे दहापैकी एकाची श्रवणशक्ती कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्याची गरज संघटनेने व्यक्त केली आहे..जन्मानंतर निदान व्हावेयाबाबत अधिक माहिती देताना रूबी हॉल क्लिनिकच्या कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. गौरी बेलसरे यांनी सांगितले की, ‘बाळाच्या जन्मानंतर त्याला ऐकू येते की नाही याचे निदान व्हायला हवे. त्यासाठी रुग्णालयात ‘ओएई’ ही चाचणी करून घ्यावी. एक लाख पैकी एक ते दोन बालके जन्मतः कर्णबधिर असू शकतात. याचे वेळीच निदान झाले तर एका वर्षानंतर त्यांच्यावर ‘कॉक्लियर इम्प्लांट’ ही शस्त्रक्रिया करता येते. त्यामुळे बाळाला ऐकायला येऊन ते बोलूही शकते.’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.